इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास एक आपले भावनिक जग.
१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ) माणूस विचाक्षम असतो , तसा असतो (भावनाशील) ही असतो.
आ) आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये जे ( चांगले ) गुण आहेत त्यांचा, प्रथम विचार करावा.
२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) व्यक्तिमत्तव संतुलित कसे बनते ?
उत्तर : भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे व्यक्तिमत्तव संतुलित बनते.
आ) समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते ?
उत्तर : राग वारंवार येत असेल किंवा अनावार होत, असेल तर त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम होतात. आपण रागीट व हट्टी होतो. त्यामुळे समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते.
इ ) आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे ?
उत्तर : आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
३. पुढील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अ ) भावनिक समोजयन म्हणजे काय ?
उत्तर : भावनांवर योग्य रीतीने नियंत्रण ठेवणे,भावनांचा मेळ घालणे,त्या योग्य प्रमाणात व्यक्त करणे याला भावनिक समोजयन म्हणतात.
आ) रागाचे कोणते दुष्परिणाम होतात ?
उत्तर : समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते, आपण रागीट व हट्टी होतो, रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखवतो, आपल्याला डोकेदुखी, निरुत्साह, निद्रानाश हे आजार होतात.
इ ) आपल्यातील उणिवांची जाणीव आपल्याला का असावी ?
उत्तर : आपल्या क्षमतांबरोबर आपल्यातील उणीवही माहीत असल्या पाहिजेत, म्हणजे प्रयत्न करून उणिवांवर मात करता येते. एखादी गोष्ट येत नाही, म्हणून जे येते त्यात प्राविण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करू नये.
Comments