इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास एक आपले भावनिक जग.




१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

अ) माणूस विचाक्षम असतो , तसा असतो (भावनाशील) ही असतो.

आ) आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये जे ( चांगले ) गुण आहेत त्यांचा, प्रथम विचार करावा.

२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) व्यक्तिमत्तव संतुलित कसे बनते ?
उत्तर : भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे व्यक्तिमत्तव संतुलित बनते.

आ) समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते ? 
उत्तर : राग वारंवार येत असेल किंवा अनावार होत, असेल तर त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम होतात. आपण रागीट व हट्टी होतो. त्यामुळे समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते.

इ )  आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे ? 
उत्तर : आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

३. पुढील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

अ ) भावनिक समोजयन म्हणजे काय ?
उत्तर : भावनांवर योग्य रीतीने नियंत्रण ठेवणे,भावनांचा मेळ घालणे,त्या योग्य प्रमाणात व्यक्त करणे याला भावनिक समोजयन म्हणतात.

आ) रागाचे कोणते दुष्परिणाम होतात ?
उत्तर : समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते, आपण रागीट व हट्टी होतो, रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखवतो, आपल्याला डोकेदुखी, निरुत्साह, निद्रानाश हे आजार होतात.

इ ) आपल्यातील उणिवांची जाणीव आपल्याला का असावी ?
उत्तर : आपल्या क्षमतांबरोबर आपल्यातील उणीवही माहीत असल्या पाहिजेत, म्हणजे प्रयत्न करून उणिवांवर मात करता येते. एखादी गोष्ट येत नाही, म्हणून जे येते त्यात प्राविण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करू नये.




Comments

Popular posts from this blog

इयत्ता ५ वी विषय परिसर अभ्यास २ इतिहास म्हणजे काय स्वाध्याय.