इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास एक आपले भावनिक जग.

१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ) माणूस विचाक्षम असतो , तसा असतो (भावनाशील) ही असतो. आ) आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये जे ( चांगले ) गुण आहेत त्यांचा, प्रथम विचार करावा. २. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ) व्यक्तिमत्तव संतुलित कसे बनते ? उत्तर : भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे व्यक्तिमत्तव संतुलित बनते. आ) समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते ? उत्तर : राग वारंवार येत असेल किंवा अनावार होत, असेल तर त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम होतात. आपण रागीट व हट्टी होतो. त्यामुळे समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. इ ) आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे ? उत्तर : आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ३. पुढील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा. अ ) भावनिक समोजयन म्हणजे काय ? उत्तर : भावनांवर योग्य रीतीने नियंत्रण ठेवणे,भावनांचा मेळ घालणे,त्या योग्य प्रमाणात व्यक्त करणे याला भावनिक समोजयन म्हणतात. आ) रागाचे कोणते दुष्परिणाम होतात ? उत्तर : समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते, ...