Posts

इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास एक आपले भावनिक जग.

Image
१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ) माणूस विचाक्षम असतो , तसा असतो (भावनाशील) ही असतो. आ) आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये जे ( चांगले ) गुण आहेत त्यांचा, प्रथम विचार करावा. २. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ) व्यक्तिमत्तव संतुलित कसे बनते ? उत्तर : भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे व्यक्तिमत्तव संतुलित बनते. आ) समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते ?  उत्तर : राग वारंवार येत असेल किंवा अनावार होत, असेल तर त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम होतात. आपण रागीट व हट्टी होतो. त्यामुळे समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. इ )  आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे ?  उत्तर : आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ३. पुढील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा. अ ) भावनिक समोजयन म्हणजे काय ? उत्तर : भावनांवर योग्य रीतीने नियंत्रण ठेवणे,भावनांचा मेळ घालणे,त्या योग्य प्रमाणात व्यक्त करणे याला भावनिक समोजयन म्हणतात. आ) रागाचे कोणते दुष्परिणाम होतात ? उत्तर : समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते, ...

इयत्ता ५ वी विषय परिसर अभ्यास २ इतिहास म्हणजे काय स्वाध्याय.

Image
 १.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ) भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला  (इतिहास ) म्हणतात.   आ) इतिहास केवळ (कल्पने)च्या आधारे लिहिला जात नाही. २. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ ) शास्त्रीय पद्धत म्हणजे काय ? उत्तर : प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे महणतात. आ ) स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे ? उत्तर : स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्यलढा या कृतीचा परिणाम आहे.  इ ) इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते ? उत्तर : इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. ३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ) इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते ? उत्तर : पुरावा शोधण्यासाठी , तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे शास्त्र असे म्हटले जाते. आ) गावा...